कोटा मेंटॉर्स शाळेचे ऐतिहासिक निर्णय तब्बल 34 वर्षानंतर देशात नव शैक्षणिक धोरण लागू होणार.

कर्जत (प्रतिनिधी) :- मोदी सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणाला शैक्षणिक वर्ष 2025 – 26 पासून लागू करण्यासाठी मंजुरी दिली आहे. तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. राज्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून नवं शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.
देशात शालेय शिक्षणाचे स्वरुप आतापर्यंत 10+2 असं होतं. पण नव्या धोरणात दहावी किंवा बारावी परीक्षा ही बोर्डाची असेल, असा उल्लेख केलेला नाहीत. 10+2 ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी 5+3+3+4 अशी नवी व्यवस्था लागू होईल.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार, कसे असतील शैक्षणिक वर्षाचे टप्पे?
पहिल्या टप्पा म्हणजेच पहिली पाच वर्ष : पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरी
दुसऱ्या टप्पा म्हणजे पुढील तीन वर्ष : इयत्ता तिसरी ते पाचवी
तिसऱ्या टप्पा म्हणजेच त्यानंतरची तीन वर्ष : सहावी ते आठवी
चौथ्या टप्पा म्हणजेच उर्वरित चार वर्ष : नववी ते बारावी अभ्यासक्र पॅटर्नवर भर
नव्या पॅटर्ननुसार, बोर्डाच्या परीक्षेचं महत्त्व कमी होणार असून सत्र पॅटर्नमध्ये ही परीक्षा असणार आहे. सध्या बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदाच होते. परंतु यापुढे वर्षातून दोन वेळा सत्र पॅटर्ननुसार परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजेच नववी पासून बारावीपर्यंतचं शिक्षण आठ सत्रा विभागण्यात आलं आहे. नव्या शैक्षणिक धोरणातील आणखी वैशिष्ट्ये 10+2 ऐवजी आता शिक्षणाचा 5 +3 +3+ 4 पॅटर्न पाचवीपर्यंत शिक्षण मातृभाषेत, प्रादेशिक किंवा घरातील भाषेतच पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा प्रयत्न
सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश विद्यार्थ्यांचं ते स्वत:, सहविद्यार्थी, शिक्षक मूल्यांकन करणार विद्यार्थ्यांचं ते स्वत:, सहविद्यार्थी, शिक्षक मूल्यांकन करणार शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य मिळण्यावर भर पदवीसाठी कला आणि विज्ञानात भेद न राखता विषय निवडण्याची मुभा सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षणात समानता शालेय आणि शिक्षकांचा अभ्यासक्रमही आता बदलणार तसेच चालू वर्षी सीबीएसई बोर्डाने इयत्ता तिसरी सहावी व नववीचा अभ्यासक्र बदल केला आहे पुढील वर्षी इयत्ता चौथीचा सातवीचा व दहावीचा अभ्यासक्र बदलणार आहे म्हणजेच आता इयत्ता आठवी पास झाल्यानंतर लगेच आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी व मॅथ यासारख्या विषय घेऊन स्पर्धा परीक्षेची म्हणजे NEET ,JEE ,MHT – CET यासारख्या परीक्षांची तयारी करावी लागणार आहे त्यामुळे इयत्ता आठवी च्या खालील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इयत्ता सहावी पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी लागणार असून पालकांनी अशा शाळेमध्ये प्रवेश घ्यावा की ज्या शाळेमध्ये NEET , JEE , यासारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत आहेत त्याच ठिकाणी प्रवेश घ्यावा कारण आता सायन्स आर्ट्स कॉमर्स या शाखा बंद होणार आहेत त्यामुळे आपल्या पाल्याचा प्रवेश स्पर्धा परीक्षेची तयारी ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी करावा