रयत शिक्षण संस्थेत ३८ वर्षे सेवा; कर्जतमध्ये ५० वर्षांपासून वास्तव; दशक्रिया विधी ७ जून रोजी सिद्धटेक येथे होणार आहे.३० मे २०२५ — रयत शिक्षण संस्थेत ३८ वर्षे ज्ञानदानाचे कार्य करून शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे, विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय व आदर्श शिक्षक विठ्ठल गेणबा मोरे उर्फ ‘आण्णा’ यांचे दि. २९ मे २०२५ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
मोरे सरांनी संपूर्ण सेवाकाळात शिक्षणक्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करत विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाबरोबरच मूल्यांची रुजवण केली. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत राहून आदर्श शिक्षकी वृत्तीचे दर्शन घडवले. शिस्त, नेमकेपणा, आणि कष्टाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात कायमचे कोरले. त्यामुळेच त्यांना ‘विद्यार्थीप्रिय शिक्षक’ म्हणून लौकिक लाभला होता.
कर्जत येथे गेली ५० वर्षे वास्तव्यास असलेल्या मोरे सरांना ‘आण्णा’ या नावाने सर्वत्र ओळखले जात होते. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या निधनाने कर्जत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. दशक्रिया विधी शनिवार, दि. ७ जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सिद्धटेक येथे पार पडणार आहे.