तुकाई उपसा सिंचन योजना प्रलंबित ठेवणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याचे जल संधारण मंत्र्यांचे निर्देश

कर्जत (प्रतिनिधी) : – तुकाई उपसा सिंचन योजना भाजप सरकारच्या काळात मंजूर करून, सर्व परवानग्या मिळालेल्या असताना मात्र मविआ सरकारच्या काळात जाणीव पूर्वक फक्त भूसंपादन झाले नाही म्हणत योजना प्रलंबित ठेवली गेली आणि संबंधित लाभधारक शेतकरी हा पाण्यावाचून वंचित ठेवला गेला. लाभार्थी शेतकऱ्यावर हा अन्याय आहे . याची जबाबदारी निश्चित करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी करून आ. प्रा.राम शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले अशी माहिती बैठकीला उपस्थित असलेले भाजप कर्जत तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी, तुकाई उपसा जलसिंचन योजने संबंधातील तांत्रिक प्रश्न दूर करण्या संदर्भात आ. प्रा.राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यां समवेत मृद व जल संधारण मंत्री संजय राठोड यांनी बैठक आयोजित केली होती.
बैठकीच्या सुरुवातीलाच अधिकाऱ्यानी वनविभागाच्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत फक्त उदभवाचे भूसंपादन राहिले आहे असे म्हणून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला पण आमदार प्रा.राम शिंदे यांनी संबंधित भूसंपादन चार वर्षे का झाले नाही? असे विचारले असता संबंधित शेतकरी सरळ खरेदीने भूसंपादन देण्यास संमत होता परंतु नंतर त्याने नकार दिला असे अधिकारी यांनी सांगताच आमदार प्रा राम शिंदे यांनी ” हे तुम्हाला समजायला चार वर्षे लागली का? तुम्ही सरकार म्हणून संपादन का केले नाही? सदरहू भूसंपादनाचा मोबदला सुद्धा योजनेच्या किमतीत समाविष्ट आहे असे असताना तुम्ही चार वर्ष जाणीवपूर्वक ही योजना प्रलंबित ठेऊन दुष्काळी, अवर्षण प्रवण भागातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले .हा अक्षम्य गुन्हा आहे . कोणाच्या तरी श्रेयवादाच्या लढाईत तुम्ही दुष्काळी शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय केला आहे असे म्हणत दोषींवर जबाबदारी निश्चित करत कारवाई करावी तसेच भूसंपादनाचे पैसे शिल्लक आहेत तर तत्काळ त्यासंबंधी कारवाई करुन भुसंपादन करावे व मार्च २०२४ अखेर योजना पूर्ण करावी अशी मागणी केली . त्यांच्या मागणीला दुजोरा देत मंत्री संजय राठोड यांनी दोषीवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्याचे निर्देश देत मार्च २०२४ पर्यत तुकाई उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याचे आदेश दिले . .
संबंधित भूसंपादन करावयाच्या शेतकऱ्याचे सरकार विरोधात वकिलपत्रच तुकाई उपसा सिंचन योजनेसाठी आंदोलन करण्याचे नाटक करणाऱ्या पुढाऱ्यांनी घेतले आहे. अशीही रंजक माहिती पुढे येत आहे . श्रेयवादाचे राजकारण यामध्ये हि अवर्षण प्रवण भागाला दिलासा देणारी योजना प्रलंबित ठेवण्याचे पाप मागिल ४ वर्षापासून सत्ताधारी मविआ सरकारने आणि प्रतिनिधींनी केले आहे अशी घणाघाती टिका भाजप तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी केली आहे .या बैठकीसाठी भाजप कर्जत तालुकाध्यक्ष शेखर खरमरे तसेच नंदराम नवले संचालक कृ.उ बा समिती कर्जत, गणेश पालवे जिल्हाधक्ष भाजप भ.वि.आघाडी, संपतराव बावडकर, दत्ता मुळे, गणेश काळदाते, नितीन खेतमाळस सरपंच मिरजगाव, डॉ रामदास सुर्यवंशी, अमृत लिंगडे, नंदलाल काळदाते, आदी प्रतिनिधी उपस्थित होते .