Advertisement
ब्रेकिंगमहाराष्ट्र

कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेचे टँकर राजकीय दबावाने शासनाने बंद केल्यामुळे महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Samrudhakarjat
4 0 1 9 5 1

समृध्द कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना घरोघरी टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्यात येत होता.कर्जत-जामखेड तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गावांमध्ये सद्य स्थितीला भीषण परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील निवडणुकीच्या कामात व्यस्त असणाऱ्या प्रशासनाला या गंभीर परिस्थितीचा विसर पडलेला दिसत आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला असताना प्रशासन मात्र सुस्त दिसत आहे. मागील एका महिन्यापासूनच या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. परंतु शासन दरबारी सदर गावे दुष्काळाच्या निकषात बसत नसल्याने ही गावे तहानलेलीच आहेत.मात्र आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून ५० पेक्षा जास्त गावातील नागरिकांना घरोघरी टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्यात येत होता. यामुळे नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भागत होता. परंतु काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचे कारण सांगत प्रशासनाकडून सध्या हे टँकर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून मोठे हाल होत असून विशेषतः महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दुसरीकडं अद्यापही शासकीय टँकर सुरू झालेले नाहीत. मागील पाच वर्षांपासून कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत लोकांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा केला गेला. परंतु सध्या प्रशासनाकडून हे टँकर बंद करण्यात आल्याने लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. टँकर पुन्हा सुरु न झाल्यास लोकांमधील संतापाची तीव्रता अधिक वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे शासनास सहाय्यभूत ठरणाऱ्या ‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थे’च्या माध्यमातून टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात येवा आणि शासकीय टँकर ही सुरु करुन लोकांच्या मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. या गावातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. स्वतः ही करायचा नाही आणि दुसरा करतोय त्यालाही आडकाठी’ अशा प्रकारच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे नाराज झालेल्या महिला भगिनींनी येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेचे टँकर पूर्वत चालू करण्याबाबतचे निवेदन तहसीलदार गुरु बिराजदार यांना दिले.

प्रशासनाने टँकर बंद करून महापाप करू नये गेले पाच वर्षापासून आमदार रोहित पवार यांच्या सहकार्यातून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेकडून मागेल त्या गावाला पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला जात होता प्रशासनाला सर्व महिलांच्या वतीने विनंती करते कोणाच्याही सांगण्यावरून हे महापाप करू नका पाणी टँकर पूर्ववत सुरू करा अन्यथा येणाऱ्या काळात जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल ; सौ.पुजा सूर्यवंशी राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्षा

जनतेच्या मूलभूत हक्कांवरच प्रशासन गदा आणणार आहेत का अशा दुष्काळाच्या परिस्थितीत 2013 साली प्रशासनाने अनेक सामाजिक संस्थांना प्रशासनाच्या मदतीसाठी अहवान केले होते.पण आत्ताचे प्रशासन संबंधितांच्या दबावापोटी चुकीच्या गोष्टी करून पाण्याने तहानलेल्या गावांचे टँकर बंद करण्याचे काम करीत आहे. आपण टंचाईच्या काळा! आपण जनतेला जगवण्याचे काम केले पाहिजे आपल्याला कुणाचा दबाव असेल तर तसेही सांगा समाज त्यांचेहीच बघून घेईल आपल्याला सामाजिक संस्था मदत करत असेल तर आपण आज या परिस्थितीला मदत घेणे गरजेचे आहे त्यामुळे आपण या विषयात मार्ग काढून टँकर पुन्हा चालू करून द्यावेत श्री.रघुआबा काळदाते राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हा उपाध्यक्ष
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker