Advertisement
ब्रेकिंग

स्वाभिमानी यात्रेत गावा गावात आ.रोहित पवार यांच्यासाठी जनतेचा मोठा सहभाग

Samrudhakarjat
4 0 1 8 9 2

ऋषिकेश पवार (प्रतिनिधी) :- कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांची मतदारसंघांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून स्वाभिमानी यात्रा सुरु आहे. ‘वारी विचारांची… निष्ठावंतांची… नव्या पर्वाची’ या टॅगलाईनखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत. गावागावांमध्ये जाऊन स्वच्छता अभियान, वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम घेतले जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.

या यात्रेच्या निमित्ताने शेकडो कार्यकर्ते हे आ. रोहित पवार यांनी मतदारसंघात केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर पक्षाला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिलेल्यांना स्वाभिमानाचे बिरुद लावत अधिकाधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आ. रोहित पवार यांनी राज्यभर दौरे करुन आपला प्रभाव निर्माण केला आहे. त्याचेच द्योतक म्हणून मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी संघटित होऊन सक्रियपणे ‘स्वाभिमानी यात्रा’ काढली आहे. त्याचा मोठा परिणाम मतदारसंघातील जनतेवर होणार असल्याचे दिसत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker